शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

सांगली आमदारांचे ११ महिन्यांत २० कोटी खर्ची, महिन्यात पाच कोटींचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 23:33 IST

सांगली : जिल्ह्यात विधानसभा आठ आणि तीन विधानपरिषदेचे आमदार असून, यांच्यासाठी २०१७-१८ वर्षामध्ये विकास निधी म्हणून २५ कोटी १९ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर होता.

ठळक मुद्देनिधीतील अखर्चित रक्कम एप्रिलमध्ये जाणार शासनाकडे परत

अशोक डोंबाळे ।सांगली : जिल्ह्यात विधानसभा आठ आणि तीन विधानपरिषदेचे आमदार असून, यांच्यासाठी २०१७-१८ वर्षामध्ये विकास निधी म्हणून २५ कोटी १९ लाख ६७ हजारांचा निधी मंजूर होता. यापैकी ११ महिन्यांमध्ये २० कोटी ४२ लाखांच्या निधीतून ४०३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. उर्वरित पाच कोटींची कामेच आमदारांनी सुचविली नसल्यामुळे तो निधी एका महिन्यात खर्च करण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. शिल्लक निधी वेळेत खर्च केला नाही तर, तो दि. १ एप्रिलला परत राज्य शासनाकडे जाणार आहे.

राज्य शासनाकडून प्रत्येक विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांना वर्षाला दोन कोटींचा विकास निधी दिला जातो. मतदारसंघातील गावांमध्ये त्यांच्या गरजेनुसार रस्ते, गटारी, सांस्कृतिक भवन, पूर संरक्षित भिंत, स्मशानभूमी आदी कामांवर निधी खर्च करता येतो. या निधीच्या दीडपटीमध्ये विकास कामे करण्याचा अधिकारही आमदारांना शासनाने दिले आहेत. काही आमदार दोन कोटींहून अधिक निधी खर्च करतात. पण, काही आमदारांना वर्षभरात शासनाकडून मिळणारा दोन कोटींचा निधीही खर्च होत नसल्यामुळे जादाचा निधी खर्चाचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सांगली जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत.

शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी २०१७-१८ या वर्षात दोन कोटी दोन कोटी २४ लाख ६३ हजाराच्या २९ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. निधी खर्च करण्याचे प्रमाण ९९.५० टक्के असून, जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या खर्चाच्या आकडेवारीत सर्वाधिक आहे. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा त्या खालोखाल क्रमांक लागत असून, त्यांनी ९८.३८ निधी खर्च केला आहे. विधानपरिषदेचे आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातील ९८.१ टक्के निधी खर्च आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुमनताई पाटील यांनीही ९७.७४ टक्के निधी खर्च झाला आहे.

खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचा ६४.५० टक्के, तर इस्लामपूर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांचा ७७.९४ टक्के निधीतून विकास कामे केली आहेत. सर्वात कमी निधी पलूस-कडेगावचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा ४०.६२ टक्के झाला आहे. जतचे आमदार विलासराव जगताप यांचा ८४.१३ टक्के, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचा ९२.३८ टक्के निधी खर्च झाला आहे.

विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम यांचा ६७.७५ टक्के, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा आमदार फंडही ८०.८६ टक्केच खर्च झाला आहे. हा निधी त्वरित खर्च करण्याची मागणी होत आहे.गावांना नाही निधी : प्रशासनाचे दुर्लक्षजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी मिळत नाही. अनेक गावांना रस्ते, गटारी, पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी निधी नसल्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय होते. असे असतानाही आमदारांच्या विकास निधीतील लाखो रुपयांचा फंड शिल्लक राहतोच कसा, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य आणि काही गावाच्या सरपंचांनी उपस्थित केला आहे.आमदारांच्या निधी खर्चाचा लेखाजोखा(जानेवारीअखेर)आमदार मंजूर निधी खर्च टक्केवारीतशिवाजीराव नाईक २२५.७६ लाख ९९.५०अनिल बाबर २२६.६५ लाख ६४.५०जयंत पाटील २७४.८३ लाख ७७.९४सुरेश खाडे १७६.४७ लाख ९२.३८सुधीर गाडगीळ २३७.१० लाख ९८.३८पतंगराव कदम २२८.६० लाख ४०.६२विलासराव जगताप २१८.२३ लाख ८४.१३सुमनताई पाटील २३६.४१ लाख ९७.७४सदाभाऊ खोत २२८.३५ लाख ८०.८६शिवाजीराव देशमुख १७४.६६ लाख ९८.१मोहनराव कदम २९३.६१ लाख ६७.७५एक महिन्यात जवळपास पाच कोटींचा निधी खर्च करण्याचे आमदार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दि. ३१ मार्चअखेर निधी खर्च झाला नाही, तर तो शासनाकडे परत जाणार आहे.